सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र केले जाते. अग्निहोत्रावर महाराष्ट्रातही संशोधन करण्यात आले. या संशोधनावर आधारित यशवंत भास्कर सोहोनी यांनी केलेले लेखन आहे. हे पुस्तक चार विभागात ग्रंथातून उद्दिपित केलेली उद्यमशील उपयोगिता आहे.
प्रथम अग्निहोत्राची मूळ कल्पना सांगितली आहे. अग्निहोत्राचे वैज्ञानिक आणि अध्यात्मिक दृष्टीने विवेचन केले आहे. दुसऱ्या विभागात अग्निहोत्राच्या वातावरणात जिवाणूंचे आणि रोगाणूंचे परिभ्रमण, प्रतिकारशक्तीचे अध्ययन, सूर्योदय-सूर्यास्त काळात वातावरणाचे शुद्धतेच्या दृष्टीने अध्ययन दिले आहे.
तिसऱ्या विभागात मानवी जीवनावर होणाऱ्या मनोवैज्ञानिक परिणामाचा अभ्यास केला आहे. चौथ्या विभागात योग आणि अग्निहोत्राचा संबंध दाखविला आहे. पौर्वात्य विचारसरणी चिंतनात्मक आणि पाश्चिमात्य संशोधनात्मक आहे. हे दोन्ही विचार या लेखनात एकत्र केले आहेत.
प्रकाशक : संगीता दिलीप काळे
पाने : २४०
किंमत : २५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)